[Kavishala Labs] महाराष्ट्र राज्य पूर्व से ही साहित्य संपन्न रहा है. यहाँ के साहित्य में प्राचीन लोक संस्कृति एवं मराठा वीरों की शौर्य गाथाएं परिलक्षित होती हैं. महाराष्ट्र राज्य ने प्राचीन काल से भारत को गौरवान्वित करने का कार्य किया है. यहाँ की मिटटी वीरों व विद्वानों दोनों से समृद्ध रही है. 

साहित्य की दृष्टि से देखा जाये तो महाराष्ट्र के साहित्यकारों ने मानवीय संवेदनाओं व सामाजिक सरोकार से जुड़े मुद्दों को केंद्र में रख कर साहित्य सृजन किया है. यहाँ के काव्य साहित्य में वीर योद्धाओं की गाथाएं, मराठी लोक संस्कृति, सामाजिक बुराइयों का विरोध व समानता का भाव मूल रूप से देखने को मिलता हैं. प्रस्तुत हैं महाराष्ट्र के कुछ श्रेष्ट कवि एवं उनकी कविताएं--


(१) बहिणाबाई चौधरी (1880 – 3 दिसम्बर 1951 ) एक मराठी कवयित्री थीं. वे जन्म भर निरक्षर रहीं, इसिलिए जो कविता वो गाती थी उन कविताओं को उनके परिवार के सदस्यों ने ही कलमबद्ध किया था. उनकी कुछ कविताएं नष्ट भी हो गईं. उनकी कविताएं विशेष रूप से उनकी मातृभाषा पर अवलंबित हैं. प्रस्तुत हैं उनकी कुछ प्रसिद्ध कविताएं -

[१]

अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर

आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर !

अरे, संसार संसार, खोटा कधी म्हणू नये

राउळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये

अरे, संसार संसार, नाही रडनं, कुढनं

येड्या, गळ्यातला हार, म्हणू नको रे लोढणं 

अरे, संसार संसार, दोन जिवांचा विचार

देतो सुखाला नकार आणि दुःखाला होकार 


[२] अरे खोप्यामधी खोपा

सुगडिणीचा चांगला

पहा पिल्लासाठी तिनं

झोका झाडाला टांगला

पिल्लं निजती खोप्यात

जसा झुलता बंगला

तिचा पिल्लांमधी जीव

जीव झाडाला टांगला

खोपा विणला विणला

जसा गिलक्याचा कोसा

पाखराची कारागिरी

जरा बघ रे माणसा

तिची उलूशीच चोच

तेच दात, तेच ओठ

तुले दिले रे देवानं

दोन हात, दहा बोटं


(2) मंगेश के. पाडगाँवकर (10 March 1929 – 30 December 2015) मराठी भाषा के विख्यात साहित्यकार थें. मराठी साहित्य में उनका अतुलनीय योगदान है. उनके द्वारा रचित एक कविता–संग्रह सलाम के लिये उन्हें सन् 1980 में साहित्य अकादमी पुरस्कार से सम्मानित किया गया. प्रस्तुत है उनकी मराठी कविता-


[१]

भेट तुझीमाझी स्मरते अजुन त्या दिसाची

धुंद वादळाची होती रात्र पावसाची

कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा

आंधळ्या तमातुन वाहे आंधळाच वारा

तुला मुळी नव्हती बाधा भीतिच्या विषाची

धुंद वादळाची होती रात्र पावसाची

क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती

नावगाव टाकुन आली अशी तुझी प्रीती

तुला मुळी जाणिव नव्हती तुझ्या साहसाची

धुंद वादळाची होती रात्र पावसाची

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली

ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली

श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची

धुंद वादळाची होती रात्र पावसाची

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास

स्वप्‍नातच स्वप्‍न दिसावे तसे सर्व भास

सुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची

धुंद वादळाची होती रात्र पावसाची


[२]

हात तुझा हातातुन

धुंद ही हवा

रोजचाच चंद्र आज

भासतो नवा

रोजचेच हे वारे

रोजचेच तारे

भासते परि नवीन

विश्व आज सारे

ही किमया स्पर्शाची

भारते जीवा

या हळव्या पाण्यावर

मोहरल्या छाया

मोहरले हृदय तसे

मोहरली काया

चांदण्यात थरथरतो

मधुर गारवा

जन्म जन्म दुर्मिळ हा

क्षण असला येतो

स्वप्‍नांच्या वाटेने

चांदण्यात नेतो

बिलगताच जाईचा

उमलतो थवा

क्षणभर मिटले डोळे

सुख न मला साहे

विरघळून चंद्र आज

रक्तातुन वाहे

आज फुले प्राणातून

केशरी दिवा


[३] विष्णु वामन शिरवाडकर (27 February 1912 – 10 March 1999) "कुसुमाग्रज" उपनाम से प्रसिद्ध है.वे मराठी भाषा के श्रेष्ठ लेखक, कवि व गीतकार थे, साहित्य के क्षेत्र में उत्कृष्ट योगदान देने के लिए इन्हें 1987 में ज्ञानपीठ पुरस्कार से सम्मानित किया गया था. प्रस्तुत हैं उनकी कविताएं- 


[१]

हासरा नाचरा, जरासा लाजरा,

सुंदर साजिरा श्रावण आला


तांबुस कोमल पाऊल टाकीत

भिजल्या मातीत श्रावण आला

मेघांत लावीत सोनेरी निशाणे

आकाशवाटेने श्रावण आला


लपत, छपत, हिरव्या रानात,

केशर शिंपीत श्रावण आला

इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी

संध्येच्या गगनी श्रावण आला

 

लपे ढगामागे, धावे माळावर,

असा खेळकर श्रावण आला

सृष्टीत सुखाची करीत पेरणी

आनंदाचा धनी श्रावण आला


[२]

कुणी, घर देता का रे? घर?

एका तूफानाला कुणी घर देता का?

एक तूफान भिंती वाचून,

छपरा वाचून,

माणसाच्या माये वाचून,

देवाच्या दये वाचून,

डोंगरा डोंगरात हिंडत आहे.

जिथुन कुणी उठवनार नाही,

अशी जागा ढूंढत आहे,

कुणी, घर देता का रे? घर?


काय रे बाळा, खरच सांगतो बाबांनो

तूफान आता थकून गेलय,

झाडा-झुडपात, डोंगर-दर्यात,

अर्ध-अधिक तुटून गेलय,

समुद्राच्या लाटांवरती,

वनव्याच्या जाळावरती,

झेप झुंज घेऊन घेऊन,

तूफान आता थकलय.

 

जळके तूटके पंख पालवित,

खुरडत खुरडत उडत आहे,

खर सांगतो बाबांनो,

तुफनाला तूफानपनच नडतय रे,

हे.. बाबा.. कुणी घर देता का रे? घर?

 

तुफनाला महाल नको,

राजवाड्याचा सेट नको,

पदवी नको, हार नको,

थैली मधली भेट नको,

एक हव लहान घर..

पंख मिटु पडण्यासाठी,

एक हवी आराम खुर्ची..

तुफनाला बसण्यासाठी,

एक तुळशी वृंदावन हवय..

मागच्या अंगणात.. सरकारांसाठी.

कुणी घर देता का रे? घर?

 

[४] गजानन दिगंबर माडगूळकर (1 अक्टूबर 1919 – 14 दिसम्बर 1977) मराठी भाषा के प्रमुख कवि, गीतकार, लेखक तथा अभिनेता थे. महाराष्ट्र में वे अपने नाम के आद्यक्षरों 'गदिमा' से ही अधिक जाने जाते हैं. मराठी साहित्य-संस्कृति के लिए उनका योगदान महत्वपूर्ण हैं. प्रस्तुत हैं उनकी कविताएं- 


[१]

त्या तिथे

पलिकडे तिकडे

माझिया प्रियेचे झोपडे!


गवत उंच दाट दाट

वळत जाइ पायवाट

वळणावर अंब्याचे

झाड एक वाकडे


कौलावर गारवेल

वाऱ्यावर हळु डुलेल

गुलमोहर डोलता

स्वागत हे केवढे !


तिथेच वृत्ति गुंगल्या

चांदराति रंगल्या

कल्पनेत स्वर्ग तो

तिथे मनास सापडे


[२]

इवल्याइवल्याशा

टिकल्याटिकल्यांचें

देवाचे घर बाई, उंचावरी

ऐक मजा तर ऐक खरी


निळीनिळी वाट

निळेनिळे घाट

निळ्यानिळ्या पाण्याचे

झुळुझुळु पाट

निळ्यानिळ्या डोंगरांत

निळीनिळी दरी

 

चांदीच्या झाडांना

सोन्याची पानें

सोनेरी मैनेचें

सोनेरी गाणें

सोन्याची केळीं

सोन्याचा पेरू

सोनेरी आंब्याला

सोन्याची कैरी

 

देवाच्या घरात

गुलाबाची लादी

मऊमऊ ढगांची

अंथरली गादी

चांदण्याची हंडी

चांदण्याची भांडी

चांदोबाचा दिवा

मोठा लावला वरी


(५) सुरेश भट ( 15 April 1932 – 14 March 2003) एक प्रसिद्ध मराठी कवि थे. उन्हें ग़ज़ल सम्राट (ग़ज़लों का सम्राट) के रूप में जाना जाता था. उन्होंने मराठी भाषा में ग़जलों एवं कविताओं की रचना की थी. प्रस्तुत है उनकी कुछ मराठी ग़ज़लें[१]

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!

एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!


जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;

सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!


कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो;

पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!


सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;

एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!


स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;

एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!


वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;

सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!


संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा....

लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!


[२] 

ती कुणाची झुंज होती? तो कसा जोहार होता?

जो निखारा वेचला मी तो निखारा गार होता!

हा कसा आता उन्हाचा निर्दयी पाऊस आला?

मी मघाशी पाहिलेला मेघ काळाशार होता!


गांजले ज्यांनी मला ते शेवटी माझेच होते...

हा कळीचा दंश होता! तो फुलांचा वार होता!


ह्या करंट्यांनी स्वतःचे फोडले आधीच डोळे..

(त्यांचियासाठी उद्याचा सूर्य अत्याचार होता!)


स्वागतासाठीच माझ्या भुंकले ते आदराने

थुंकले तोंडावरी तो केवढा सत्कार होता!


गाडल्या त्यांनी पिढ्या अन् ठेवला नाही पुरावा

ह्या स्मशानाच्या धन्यांचा देव ताबेदार होता!


लागला आहे अताशा वेदनेचा शौक त्यांना

(एरवी, त्यांचा सुखाचा चोरटा व्यापार होता!)


चोरली माझ्या घराची राखही त्याने परंतू

मी न केला ओरडा..तो चोर अब्रूदार होता!


पाहिला नाही जरी मी चेहरा मारेकर्‍याचा

लोकहो, माझा तरीही खून दर्जेदार होता!

-