
अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर !
[Kavishala Labs] महाराष्ट्र राज्य पूर्व से ही साहित्य संपन्न रहा है. यहाँ के साहित्य में प्राचीन लोक संस्कृति एवं मराठा वीरों की शौर्य गाथाएं परिलक्षित होती हैं. महाराष्ट्र राज्य ने प्राचीन काल से भारत को गौरवान्वित करने का कार्य किया है. यहाँ की मिटटी वीरों व विद्वानों दोनों से समृद्ध रही है.
साहित्य की दृष्टि से देखा जाये तो महाराष्ट्र के साहित्यकारों ने मानवीय संवेदनाओं व सामाजिक सरोकार से जुड़े मुद्दों को केंद्र में रख कर साहित्य सृजन किया है. यहाँ के काव्य साहित्य में वीर योद्धाओं की गाथाएं, मराठी लोक संस्कृति, सामाजिक बुराइयों का विरोध व समानता का भाव मूल रूप से देखने को मिलता हैं. प्रस्तुत हैं महाराष्ट्र के कुछ श्रेष्ट कवि एवं उनकी कविताएं--
(१) बहिणाबाई चौधरी (1880 – 3 दिसम्बर 1951 ) एक मराठी कवयित्री थीं. वे जन्म भर निरक्षर रहीं, इसिलिए जो कविता वो गाती थी उन कविताओं को उनके परिवार के सदस्यों ने ही कलमबद्ध किया था. उनकी कुछ कविताएं नष्ट भी हो गईं. उनकी कविताएं विशेष रूप से उनकी मातृभाषा पर अवलंबित हैं. प्रस्तुत हैं उनकी कुछ प्रसिद्ध कविताएं -
[१]
अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर !
अरे, संसार संसार, खोटा कधी म्हणू नये
राउळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये
अरे, संसार संसार, नाही रडनं, कुढनं
येड्या, गळ्यातला हार, म्हणू नको रे लोढणं
अरे, संसार संसार, दोन जिवांचा विचार
देतो सुखाला नकार आणि दुःखाला होकार
[२] अरे खोप्यामधी खोपा
सुगडिणीचा चांगला
पहा पिल्लासाठी तिनं
झोका झाडाला टांगला
पिल्लं निजती खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिल्लांमधी जीव
जीव झाडाला टांगला
खोपा विणला विणला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा बघ रे माणसा
तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले दिले रे देवानं
दोन हात, दहा बोटं
(2) मंगेश के. पाडगाँवकर (10 March 1929 – 30 December 2015) मराठी भाषा के विख्यात साहित्यकार थें. मराठी साहित्य में उनका अतुलनीय योगदान है. उनके द्वारा रचित एक कविता–संग्रह सलाम के लिये उन्हें सन् 1980 में साहित्य अकादमी पुरस्कार से सम्मानित किया गया. प्रस्तुत है उनकी मराठी कविता-
[१]
भेट तुझीमाझी स्मरते अजुन त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा
आंधळ्या तमातुन वाहे आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा भीतिच्या विषाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती
नावगाव टाकुन आली अशी तुझी प्रीती
तुला मुळी जाणिव नव्हती तुझ्या साहसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
[२]
हात तुझा हातातुन
धुंद ही हवा
रोजचाच चंद्र आज
भासतो नवा
रोजचेच हे वारे
रोजचेच तारे
भासते परि नवीन
विश्व आज सारे
ही किमया स्पर्शाची
भारते जीवा
या हळव्या पाण्यावर
मोहरल्या छाया
मोहरले हृदय तसे
मोहरली काया
चांदण्यात थरथरतो
मधुर गारवा
जन्म जन्म दुर्मिळ हा
क्षण असला येतो
स्वप्नांच्या वाटेने
चांदण्यात नेतो
बिलगताच जाईचा
उमलतो थवा
क्षणभर मिटले डोळे
सुख न मला साहे
विरघळून चंद्र आज
रक्तातुन वाहे
आज फुले प्राणातून
केशरी दिवा
[३] विष्णु वामन शिरवाडकर (27 February 1912 – 10 March 1999) "कुसुमाग्रज" उपनाम से प्रसिद्ध है.वे मराठी भाषा के श्रेष्ठ लेखक, कवि व गीतकार थे, साहित्य के क्षेत्र में उत्कृष्ट योगदान देने के लिए इन्हें 1987 में ज्ञानपीठ पुरस्कार से सम्मानित किया गया था. प्रस्तुत हैं उनकी कविताएं-
[१]
हासरा नाचरा, जरासा लाजरा,
सुंदर साजिरा श्रावण आला
तांबुस कोमल पाऊल टाकीत
भिजल्या मातीत श्रावण आला
मेघांत लावीत सोनेरी निशाणे
आकाशवाटेने श्रावण आला
लपत, छपत, हिरव्या रानात,
केशर शिंपीत श्रावण आला
इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी
संध्येच्या गगनी श्रावण आला
लपे ढगामागे, धावे माळावर,
असा खेळकर श्रावण आला
सृष्टीत सुखाची करीत पेरणी
आनंदाचा धनी श्रावण आला
[२]
कुणी, घर देता का रे? घर?
एका तूफानाला कुणी घर देता का?
एक तूफान भिंती वाचून,
छपरा वाचून,
माणसाच्या माये वाचून,
देवाच्या दये वाचून,
डोंगरा डोंगरात हिंडत आहे.
जिथुन कुणी उठवनार नाही,
अशी जाग