पुर्वसूत्र :
"घ्या रे या वेड्याला आणि नीट लक्ष ठेवा याच्या वर पाय फुटले आहेत याला इथून निसटून जायला नको पुतण्या समजून चांगलच डोक्यावर नाचवलय याला आता हे सगळच आपल्याच अंगलट आलय पण अजून ही वेळ गेली नाहीये आज हा आपल्या पायावर उभा राहिलाय हे आपल्या साठी चांगलच आहे आजच प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स बनवून घेतो आणि याची जबरदस्तीने सही घेतो मग सगळी प्रॉपर्टी माझी याच क्षणाची मी वाट बघत होतो आता तो क्षण आलाय. हा इथून निघून जायला नको याच्याकडे नीट लक्ष द्या घट्ट बांधून ठेवा याला येतो मी." संपत आपल्या माणसांना आदेश देतो.
आणि तिथून निघून जातो.
आता पुढे...
"हे तु बरोबर करत नाहीयेस काका मी आता तो तुझा ऐकणारा पुतण्या राहिलो नाहीये मी माझ अस्तित्व पूर्णपणे बदलल आहे आता मी खंबीर बनलोय तुच काय तुझे हे भाड्याचे तट्टु ही आता माझ काहीएक बिघडउ शकत नाही बस माझे हाथ एकदा सोड मग तुला दाखवतो मी कोण आहे ते. तुला माहितीये ही हिम्मत माझ्यात कुठून आली माझ्या मैत्रीणी कडुन आणि आता ही हिम्मत माझ्यातुन जाणार नाहीये तर मी असाच राहणार आहे खंबीर." आपले हाथ सोडवण्याचा प्रयत्न करत अर्णव बोलला.
"तु? आम्हाला बघणार लायकी आहे का तुझी अरे आजपर्यंत माझ्या जीवावर जगत आला आहेस तु तु काय बघणार मला इतक सोप्प नाहीये ते (आपल्या माणसांना) लक्ष ठेवा ह्याच्यावर आलोच मी." संपत
इकडे बंगल्यावर...
"मी म्हणाले होते न बेटा हा माणूस धोकेबाज आहे हा माणूस कुणाचाच सख्खा होऊ शकत नाही बेटा अर्णव बाबाला तु थोड्याशा सुखापाई धोक्यात टाकलं आहे त्यांना जर काही झाल न तर मी स्वतः लाच काय तर तुला ही माफ करणार नाही." राधाताई भीतीने बोलल्या.
"राधा ताई पॅनिक होऊ नका अर्णवला काही होणार नाही मी आहे न शांत रहा(सतीश दादांना) दादा माझ ते लॅपटॉप दाखवा." लॅपटॉप कडे बोट दाखवत मृण्मयीने सांगितल
"हे घ्या." लॅपटॉप देत सतीश दादा म्हणतात.
"बेटा पण तु लॅपटॉपच काय करणार आहेस?" इन्स्पेक्टर विजय
"काका अर्णवला मी एक पेन गिफ्ट केल होत आणि त्या पेनाला एक ट्रॅकर प्लस कॅमेरा होता ज्यामुळे आपण समोरच्याला काहीही न कळता त्यांना ट्रॅक करू शकतो आणि त्यांच्या आसपास काय घडतय हे ही बघु शकतो तो पेन माझ्या लॅपटॉपला कनेकटेड आहे फक्त तो पेन अजून ही त्याच्या जवळ आहे का हे एकदा कन्फर्म झाल की आपल खूप मोठ काम हलक होईल मी तेच बघतीये." लॅपटॉप चेक करत मृण्मयी बोलली
"हे तु काय बोलत आहेस खरच का ग्रेट." इन्स्पेक्टर विजय
"हो, काका ज्या दिवशी मी इथे यायचा डीसीजन घेतला होता त्याच दिवशी मी तसा पेन मागवून घेतला होता. (मनाशीच) ग्रेट हे बघा पेन कनेक्ट झालाय आणि लकिली त्याच्या जवळच आहे." आपल्या काकांकडे लॅपटॉप देत मृण्मयीने सांगितल
मृण्मयीने लॅपटॉप इन्स्पेक्टर विजयना दिला आणि ते लगेच निरीक्षण करू लागले.
"ग्रेट जॉब मृण्मयी आता हा संपत सुटत नाही (जाधवना). जाधव लकिली अर्णवला त्याच ठिकाणी ठेवलय आपल्या बाकीच्या लोकांना बोलवा आपल्याला त्या ठिकाणी निघायला हव." इन्स्पेक्टर विजय
"त्या ठिकाणी म्हणजे? तुम्हाला अजूनही काही समजलय का?" आश्चर्याने मृण्मयीने विचारलं
"हो बाळ संपत च्या बऱ्याच अड्ड्यांवर आम्ही छापे मारले आहेत त्याच्या या अड्डयावर सुद्धा आम्ही गेलो होतो पण या अड्डयावर आम्हाला काही मिळाल नाही बहुतेक आमची येण्याची बातमी त्यांच्या पर्यंत पहिलेच पोहोचली असावी त्यामुळे. (जाधवना) बर चला आपल्याला निघायला हव." लॅपटॉप मृण्मयीला देत इन्स्पेक्टर विजय म्हणाले.
लॅपटॉप देऊन इन्स्पेक्टर विजय आपल्या कॉन्स्टेबल्सना घेऊन तडक तिथून निघून गेले.
काही वेळा नंतर...
एका अडगळीच्या खोलीत...
"पकडा रे त्यांना! संपत तु आता सुटत नाही जाधव अरेस्ट हीम खूप लोकांच आयुष्य या नराधमाने बरबाद केलय आता याला सुटका नाही पकडा याला." इन्स्पेक्टर विजय ने जाधवना ऑर्डर दिली
लगेच जाधवनी संपत आणि त्याच्या साथीदारांना अरेस्ट केल व त्यांच्या पासून अर्णवची सुटका केली.
काही वेळा नंतर...
कृष्णाई बंगल्यावर...
राधा ताई आणि मृण्मयी दारात अर्णवची वाट पहात उभ्याचं होत्या इन्स्पेक्टर विजय ची गाडी आलेली बघताच मृण्मयीने आरतीची थाळी आणि नजर उतरावयाला चत्कर पोळी तसेच पाय धुवायला पाण्याचा ग्लास आणला.
"थांब थांब आधी पाय धुवा" पायावर पाणी टाकत राधा ताई म्हणाल्या.
नंतर त्यांनी लगेच नजर काढली आणि अर्णवला ओवाळून बंगल्यात घेतल.
आज पूर्ण मुक्तपणे अर्णव आपल्या स्वतः च्याच बंगल्याला न्याहाळत होता आज त्याला कसलीच भीती नव्हती तो पहिल्यांदा स्वछंदी आयुष्य जगण्याच स्वप्न बघत होता मृण्मयी बरोबर.
कारण आता त्याच्या आयुष्यातल संपत नावाचं वादळ दूर झाल होत आणि त्याच्या आयुष्यात आनंद सुखाचा झरा व्हायला सुरवात झाली होती.
आता अर्णवच्या आयुष्यात फक्त सुख आणि आनंदच होता. पण तरीही काही तरी कमी होतीच आणि ती म्हणजे त्याच कुटुंब.
आपल्या अर्णवच्या किडन्यापिंग मुळे व्यथित झालेल कुलकर्णी कुटुंब यूएसला शिफ्ट झाल होत पण ही गोष्ट अर्णवला मात्र माहित नव्हती म्हणूनच त्यांचा शोध कसा घ्यायचा हाच एक मोठा प्रश्न आता त्याच्या समोर उभा होता.
पंधरा दिवसा नंतर...
वेळ सकाळची...
९ वाजता ची...
अर्णव गॅलरीत एकटाच आपल्याच विचारात मग्न होता गतकाळात घडलेल्या घटना त्याला राहून राहून आठवत होत्या. त्याच्या डोळ्यात पाणी होत
तोच मृण्मयी त्याच्या जवळ आली.
"अरु झाल सगळ आता. आता फक्त तु आणि मी बस कॉफी?" कॉफी चा कप देत मृण्मयी म्हणाली
"आणि आई बाबा आरव गायत्री. खूप आठवण येतीये ग त्यांची मला कुठे असतील काय करत असतील त्यांना ही माझी आठवण येत असेल का? लहानपणापासून त्यांची आठवण मनात ठेऊन सगळ सहन करत राहिलो मी माझ्या मनात फक्त त्यांचाच विचार असायचा कधी तर भेटतील मला आता पर्यंत अधुरं राहिलेलं त्यांच प्रेम ते माझ्यावर करतील मला सावरून धरतील हाच विचार मनात असायचा आणि आता सगळ नीट झालय तर तेच नाहीत." अर्णव चहाचा कप हातात घेत म्हणाला
"अस कस म्हणतोस तु एवढाच विश्वास आहे का माझ्यावर आई बाबांच्या प्रेमावर. आपण शोधू त्यांना मी आहे न मी ठरवलय तुला आयुष्यभर साथ द्यायची मग यावेळी सुद्धा कस तुला एकट सोडीन मी अं. अरु तु माझा आत्मा आहेस मग मला सांग आपल्या आत्म्याला आपल्या पासून कुणी दूर करत का? शोधूत आपण त्यांना काळजी करू नकोस." मृण्मयी समजावते
"एवढ प्रेम करतेस माझ्यावर?" अर्णव
"तु नाही करत? (दोघ ही एक क्षण एकमेकांकडे बघु लागले लगेच भानावर येत). अरे हो तुझ्या प्रॉपर्टीच ही आता तुलाच बघावं लागेल त्या संपतनी तुझ्या नावाखाली काय काय घोळ घालून ठेवलेत देव जाणे सगळ एकदा काकांना भेटून बघून घे आणि परत पुस्तकं लिहायला ही सुरवात कर आयुष्यातली वादळ आता संपली आहेत आता फक्त मुक्तपणे जगायच आहे तुला तुझ्या मार्जिनुसार आणि मी तर आहेच तुझ्या बरोबर कायम." मृण्मयी
"खरय तुझ तु आज पर्यंत होतीस म्हणून मी इथपर्यंत खंबीरपणे येऊ शकलो नाही तर खरच माझ काय झाल असत मी तर विचार पण करू शकत नाही ए पण एका गोष्टीचा मला विचार करायचा आहे." अर्णव
"कुठल्या गोष्टीचा?" मृण्मयी
"तुझ्या स्वप्नाचा मला तु पाहिलेल्या स्वप्नात तुझी मदत करायची आहे तुला तुझ ड्रीम हाऊस मिळवून द्यायचं आहे चालेल तुला?" अर्णव
"म्हणजे तु मला तुझ्या पासून दूर करणार?(थोडस थांबून) मजा घेते रे चालेल न त्यात काय उलट जर का हे ड्रीम आपण दोघांनी मिळून पूर्ण केल तर आपल्याला अजून एकमेकांन बरोबर वेळ मिळेल घालवायला चालेल कर तु मला हेल्प." मृण्मयी आनंदून म्हणाली
"चालेल मग माझे दोन तीन मित्र आहेत मी त्यांच्याशी बोलून घेतो ते आपल्याला चांगल्या जमिनी दाखवतील आजच बोलतो." स्माईल करत अर्णव बोलला
आणि दोघ एकमेकांन मध्ये हरवून गेले.
क्रमशः...
एक पर्व संपल अर्णव च्या आयुष्यातले दुःखाची वादळे दूर झाली आता अजून यांच्या आयुष्यात काय काय घडत अर्णव चे आई बाबा कसे भेटतात त्याच पुस्तकं कस प्रकाशित होत आणि मृण्मयी च स्वप्न कस पूर्ण होत बघुत पुढील भागामध्ये

