पुर्वसूत्र :
काही वेळा नंतर...
त्याला लॅब मधून बाहेर आणतात मृण्मयी तोपर्यंत गोळ्या घेऊन येते आणि दोघ ही घरी परतात.
आता पुढे...
काही वेळा नंतर...
मृण्मयी कृष्णाई बंगल्यावर परत आली तीने आपली कार नेहमीच्या ठिकाणी लावली आणि अर्णवला व्हीलचेअर वर बसवून बंगल्यात घेऊन गेली.
"बाप, रे काय गर्दी होती क्लिनिकमध्ये पण बर झाल डॉक्टर बाबांचे स्टुडन्ट होते त्यामुळे लवकर नंबर लागला." मृण्मयी
"बर काय म्हणाले मग डॉक्टर काळजी करण्यासारखं नाही ना काही." राधा ताई
मृण्मयीने पाण्याचा ग्लास घेतला आणि पाणी पिता पिता बोलु लागली.
"अजिबात नाही काहीच काळजी करण्यासारखं नाहीये आपण टेस्ट केल्या आहेत आता जस रिपोर्ट येईल पुढची प्रोसेस काय असेल ते ठरेल तोपर्यंत काही गोळ्या दिल्या आहेत त्या कंटीन्यु ठेवायला सांगितल आहे." मृण्मयी
"देवा खूप खूप आभार तुमचे मी देवासमोर साखर ठेऊन येते." राधा ताई
राधा ताईंनी दोघांच्या हातातला ग्लास घेतला आणि देवासमोर साखर ठेवायला गेल्या.
"सतीश दादा चला अर्णव ला रूम मध्ये नेऊत." मृण्मयी
दोघांनी व्हीलचेअर उचलली आणि खोलीत नेली.
काही क्षणा नंतर...
"तु आराम कर आज तुला लिहायला ही सुरवात करायची आहे न." मृण्मयी.
"हो आज बघायचच आहे लिहायला सुरवात करून पाहु काय होत ते." अर्णव
"मला एक सांग तुला नेमक काय लिखाण करायचय म्हणजे तुझ्या बुक च टॉपिक काय आहे काही तरी विचार केलाच असेल न तु." मृण्मयी
"मला तेच तर सुचत नाहीये ग पण पुस्तकं लिहायचं आहे एवढ नक्की." अर्णव
"बर, तुला एक सांगते आपले डोळे बंद कर एक दीर्घ श्वास घे आणि शांत राहून विचार करण्याचा प्रयत्न कर मनात डोकावून बघ कुठला शब्द किंवा चेहरा येतोय तुझ्या समोर ते बघण्याचा प्रयत्न कर हे बघ ज्या वेळी आपण आपल कुठलं ही पाहिलं साहित्य लिहायला सुरवात करतो न आणि नेमक आपल्याला काही सुचत नाही आपल्याला पहिल्याच टप्प्यात एक इतिहास घडवणार साहित्य लिहायचं असत पण जेव्हा आपल्याला काही सुचत नाही तेव्हा आपला आत्मविश्वास डगमगू लागतो आणि नेमक याच वेळी ही टेक्निक कामी येते. समजल इमॅजिन करून बघ की तुझ पाहिलं पुस्तकं प्रकाशित झालेल आहे अगदी डिटेल्स मध्ये बघायचा प्रयत्न कर जस तु आणि बरेच मान्यवर तुझ्या पुस्तकाची रिबीन सोडत आहे सगळे जण पुस्तक प्रेक्षकांना दाखवत आहेत टाळ्यांचा गजर ऐकायचा प्रयत्न करून बघ त्या पुस्तकावरील नाव बघण्याचा प्रयत्न कर आणि तुला जो पर्यंत स्पष्ट नाव दिसत नाही तोपर्यंत हे इमॅजिन करण्याचा प्रयत्न तुला करायचा आहे जेव्हा तुला एखाद नाव दिसेल तेच तुझ्या पुस्तकाचे नाव असेल अश्याच पद्धतीने पुढे मग पुस्तकाच्या कंटेन्ट चा ही तु विचार करू शकतोस. या टेक्निक मुळे तुला सकारात्मक विचार करण्यात ही मदत मिळेल." मृण्मयी
अर्णवने तिची प्रत्येक गोष्ट अगदी मन लावून ऐकली आणि मन शांत करून इमॅजिनेशन करण्याचा प्रयत्न करू लागला.
काही वेळा नंतर...
अर्णव इमॅजिनेशन करू लागला. तस त्याला अंधुकस दिसायला लागलं तो अजून डीप मध्ये बघण्याचा प्रयत्न करू लागला त्यामुळे त्याच्या मनातल्या नकारात्मक भावना कमी होऊ लागल्या त्याने अगदी तसच केल जे त्याला मृण्मयी ने सांगितल होत. त्याने मेडिटेशन संपवले आणि हळूच आपले डोळे उघडले.
त्याच मेडिटेशन होई पर्यंत मृण्मयी तिथेच बसली होती त्याने आपले डोळे उघडताच तीने त्याला विचारलं.
"मग कस वाटल मेडिटेशन करून?" मृण्मयी
"खूपच छान मला या आधी असा अनुभव कधीच आला नव्हता मला जाणवतय या मेडिटेशन नी मला खूप फरक पडेल." अर्णव
"ग्रेट मला हेच ऐकायचं होत ही टेक्निक तु प्रत्येक क्षेत्रासाठी वापरू शकतोस जस तुला तुझ्या आयुष्यात पॉझिटिव्हीटी हवी असेल किंवा तु तुझ्या आयुष्याची खरी कल्पना कशी करतोस म्हणजे कस हवयं नेमक तुला तुझ आयुष्यात तु या टेक्निक नी त्याची उत्तर ही शोधू शकतोस." मृण्मयी
"काय सांगतेस? अं हो तु मला एक पुस्तकं दिल आहेस वाचायला त्यात असच काहीस आहे हो ना." अर्णव
"नाही ऍक्युरेट नाही पण थोड फार याला ऍक्चुअली लॉ ऑफ अट्रॅक्शन अस म्हणतात खर तर अश्या बऱ्याच टेक्निक्स आहेत या मध्ये जस व्हिझुअलाइजेशन तुम्ही आपल्या कल्पना शक्तीच्या जोरावर जे हव ते मिळवता एवढच की हे टेक्निक करताना वर्तमानात घटना घडत आहेत अस पाहायचं असत आणि ब्रह्मांडाच्या शक्तीचे आभार मानायचे असतात." मृण्मयी
"अरे खूपच छान मी याचा नक्की उपयोग करीन थँक्यु सो मच." अर्णव
दोघांनी बऱ्याच वेळ गप्पा मारल्या मग ती ही आपल्या खोलीत निघून गेली आणि अर्णव परत विचार करू लागला. त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह आनंद स्पष्ट दिसत होता आता तो आपल्या भूतकाळातून बाहेर पडत होता आणि याच मोठ कारण होत मृण्मयी.
पंधरा दिवसा नंतर...
आता अर्णव आणि मृण्मयी मधलं नात बरच घट्ट बनत चाललं होत अर्णव ही आता फारसा रूम मध्ये बसत नव्हता त्याला अंगणातली मोकळी हवा आवडायला लागली होती. फ्रेंड्स च येणं जाण ही त्याला आवडू लागलं होत.
वेळ सकाळची...
मृण्मयीने अर्णव ला हॉलमध्ये आणलं. त्यावेळी राधा ताई नाश्त्यासाठी टेबल नीट करतच होत्या तोच मृण्मयी चा फोन वाजला.
"हॅलो, कोण बोलतय." मृण्मयी
"मृण्मयी मी बोलतीये जागृती तुला त्या मुलाची माहिती हवी होती न त्या मुलाचा पत्ता मिळाला आहे." जागृती
"काय सांगतेस ओह ग्रेट पण इतके दिवस कुठे होतीस तु ठिक आहे न सगळ." मृण्मयी
"हो हो अगदी ठिक आहे बर कुठे भेटायचं आपण." जागृती
"तुझ्या कॉलेजला भेटूत?" मृण्मयी
"नाही नको अस कॉलेजमध्ये नको भेटायला त्यापेक्षा कॉलेजसमोर एक कॅफे आहे तीथे ये तीथे भेटूत आपण." जागृती
"ओके चालेल मग मी नाश्ता झाला की लगेच निघते." मृण्मयी
दोघीनी फोन ठेवला.
"राधा ताई नाश्ता झाला का तयार मला जरा बाहेर जाऊन यायचय. आणि अर्णवला ही त्याच्या गोळ्या घ्यायच्याय." मृण्मयी
"हो... हो अग इतकी नको काळजी करुस माझी. माझ्यामध्ये आत्मविश्वास आलाय, मृण्मयी आज चक्क पंधरा दिवस झाले आहेत तुला येऊन आणि या पंधरा दिवसात तु मला खूप काही दिलस स्वतः वरचा विश्वास तुझी मैत्री माझ स्वप्न जे मी कधीच विसरलो होतो. माझ आयुष्य जे आज बदलल आहे न ते फक्त तुझ्यामुळेच." अर्णव
त्याच बोलण ऐकून मृण्मयी हसली आणि त्याच्या जवळ जात म्हणाली.
"अर्णव अरे मी काहीच केल नाहीये तु निर्धार केलास बदलण्याचा तु स्वतः हाच प्रयत्न केलेस म्हणून शक्य झाल सगळ मी तर फक्त एक माध्यम होते माझ कर्तव्य होत ते जे मी केल बस बर चल नाश्ता करून घेऊत आणि एक गोष्ट आहे जी तुला सांगायची आहे मी जो विचार करतीये ते जर यशस्वी झाल तर खूप मोठा उलगडा होऊ शकतो आल्यावर सांगेन तुला." मृण्मयी
दोघ ही एकमेकांकडे प्रेमाने बघु लागले आणि हसले. लगेच त्यांनी नाश्ता करायला सुरवात केली.
काही वेळा नंतर...
नाश्ता होताच मृण्मयी आणि सतीश दादांनी मिळून अर्णव ला आपल्या खोलीत नेलं. आणि ती बाहेर निघून गेली.
क्रमशः...
काय मृण्मयीला कृष्णाई बंगल्यावर येऊन चक्क पंधरा दिवस झाले? आता या नात्यात अजून काय होईल बघुत पुढील भागात

